शहर

….आणि महिला गहीवरल्या, अश्रूंना दिली वाट मोकळी करून…जिजाऊ ब्रिगेडने केला किडनी दान करणाऱ्या महिलांचा सन्मान

अकलूज —–प्रतिनिधी
डी.एस .गायकवाड

भावाला,पतीला तर कुणी आपल्या मुलाला स्वतःची किडनी दान करून संसार वाचविणाऱ्या महिलांच्या वेदना ऐकून उपस्थित सर्वच महिला गहिवरल्या आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. औचित्य होते महिला दिनाचे आणि या निमित्ताने किडनी दान करणाऱ्या महिलांनी आपल्या मनात साठलेल्या भावनांना वाट करून दिली आणि संपूर्ण वातावरण अगदी भावनिक झाले.

अकलूज येथे जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून कुटुंबातील व्यक्तीला किडनी दान करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा मनोरमा लावंड यांनी आयोजित केला होता. सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुरजाताई बोबडे व उपाध्यक्षा मनीषाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रांतिक सदस्या प्रियाताई नागणे, अक्काताई नागणे,माळशिरस तालुका अध्यक्षा मनोरमा लावंड,उपाध्याक्ष मनिषा गायकवाड, शहराध्यक्ष शुभांगी क्षीरसागर, कार्याध्यक्ष शारदा चव्हाण, सुवर्णा गोरवे, संघटक वंदना पवार, कल्पना चव्हाण, संगीता जगदाळे, सुनिता नडगिरे तसेच अनिता शेंडगे,अर्चना धुमाळ, विजया शिंदे,कविता पुजारी,रेखा भगत मंजुषा गायकवाड, सुजाता विरकर, सविता तरंगे, शितल केचे आदीसह बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

याप्रसंगी किडनी दान करणाऱ्या सौ रुपाली राजेंद्र घोरपडे,श्रीमती संगीता दत्तू कोळेकर,सौ रेखा विठ्ठल ठवरे,सौ जयश्री दत्तात्रय घोरपडे,सौ.अनुराधा इंगवले देशमुख,सौं.संद्या धुमाळ,श्रीमती रत्नप्रभा केचे,अलका शेंडगे,सौ सुवर्ण भोसले आदि महिलांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि साडी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी किडनी दान करणाऱ्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना जीवनात आलेल्या कटू प्रसंगाचे कथन केले. आलेल्या प्रसंगाला सामोरे जात असताना निर्णय घेत किडनी दान केल्याने समाधानी आणि आनंदी असल्याचे सांगत जीवदान दिल्याचे खूप मोठे कार्य जीवनात घडून गेल्याचा आनंद गगनात न मावणारा आहे अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या भावना ऐकून महिला वर्ग ही याप्रसंगी गहिवरला आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भारावलेल्या वातावरणात सदरचा कार्यक्रम पार पडला असला तरी जिजाऊ ब्रिगेडने आगळावेगळा कार्यक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण केल्याच्या भावना यावेळी प्रत्येक महिला व्यक्त करताना दिसत होत्या. जिजाऊ ब्रिगेडने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन केले होते.प्रत्येक महिलेच्या डोळ्यांच्या कडा अश्रूंनी भरून आलेल्या दिसत होत्या.परिसरातील बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती.

कोट

किडनी दान करून महिलांनी आदर्श निर्माण केला.

  • देहदान करून मृत्यूनंतर अवयव दान केले जाते मात्र या महिलांनी जिवंतपणीच आपले अवयव दान केल्याने एक समाजामध्ये आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.महिला या सदैव कणखरपणे संसाराला साथ देत असतात संसारात आलेल्या दुःखाला त्या निर्भीडपणे सामोरे जात असतात. कुटुंब वत्सल म्हणून महिलांची विशेष ओळख आहे. सदरील महिलांनी किडनी दान करून संसार वाचवले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
  • मनोरमा लावंड
    तालुकाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button