महाराष्ट्र
प्रतागडावरील वहातूक नियोजन तीन तेरा – प्रशासनाचे दुर्लक्ष

सांगली जिल्हा प्रतिनिधी :
आनंद सावंत,
टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121
प्रतागड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा वारसा जपणारा आणि त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा, प्रतागड हा एक जिवंत उदाहरण आहे, तो वारसा आणि पराक्रम पाहण्यासाठी शालेय सहली आणि संपूर्ण भारतातील तसेच भरता बाहेरील देशातील सुध्दा पर्यटक मोठ्या प्रमाणात या गडाला भेट देत आहेत, पण 30 मिनिटात पूर्ण होणारी वाट दीड ते दोन तास लागतात कारण वाहनांची रहदारी वाढून संपूर्ण वाहतूक ठप्प होते, परंतु विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासनाची कोणतीही वाहतूक नियत्रणा नाही आणि वाहतूक नियंत्रक सुद्धा नाहीत, त्यामुळे पर्यटकांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, प्रशासनाने या अडचणीकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे व होणारी गैरसोय दूर करावी



