कर्नाटकाची पुनरावृती भविष्यात महाराष्ट्रात होईल, मोदी सरकारच्या बेबंध शाहीला कर्नाटक राज्यातील जनतेने नाकारले-सुनील बापु सावंत मा,जिल्हा सरचिटणीस काॅग्रेस आय
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आय ने स्पष्ट बहुमत मिळवले असून कर्नाटक राज्यातील हुशार अभ्यासू मतदारांनी मोदी सरकारच्या बेबंध शाहीला लाथाडले आहे कर्नाटक राज्यातील जनतेने काँग्रेस आय ला स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस आईचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी प्रियांका गांधी तसेच सोनिया गांधी यांचे हात बळकट केले आहे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल असे सोलापूर जिल्हा काँग्रेस आय चे सरचिटणीस सुनील बापू सावंत यांनी बोलताना सांगितले
कर्नाटकात काॅग्रेस पक्षाचा विजय म्हणजेच भविष्यात भा ज प ची उलटी गिनती सुरु झाल्याची प्रतिक्रिया काॅग्रेस पक्षाचे माजी जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी दिली
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,भा ज प च्या काळात झालेली महागाई,हुकूमशाही ,तोडा फोडो चे राजकारण,ईडी, सीबीआई चा वापर आदी कारणामुळे कर्नाटका च्या जनतेने भा ज प ला स्पष्ट नाकारले आहे कर्नाटक मधील या विजयाने करमाळ्यात फटाकेची आतषबाजी व पेढे वाटुन या विजयाचे स्वागत करण्यात आले कर्नाटकची पुनरावृत्ती भविष्यात महाराष्ट्र होईल असेही ते बोलताना म्हणाले यावेळी फारूक जमादार रविन्द्र कांबळे मार्तण्ड सुरवसे , मनोज गोडसे, योगेश काकडे,सिंकदर सय्यद मजहर नालबंद हाजी फारुक बेग,साजीद बेग मनोज राखुंडे समीर शेख़ नागेश उबाळे खलील मुलाणी गोविंद किरवे रमेश हवालदार संतोष बनकर, अनिल रोड़े संभाजी गायकवाड़ गणेश अडसुळ बापू उबाळे दत्ता कांबळे रामा करंडे आदी जणानी जल्लोश केला.