महाराष्ट्र

​राज्यातील महा ई-सेवा व आधार केंद्रांचे तीन दिवसीय काम बंद आंदोलन

🔰 डिजिटल सेवेतून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईमुळे संतप्त;सरकारने मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​राज्यातील महा ई-सेवा आणि आधार सेवा केंद्रातील चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी १२/११/२०२४ ते १४/११/२०२४ या तीन दिवसांसाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

​डिजिटल इंडिया सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवून केंद्रचालक दरवर्षी ७ हजार कोटी रुपयांचे भरीव काम शासनाला करून देतात. मात्र, या कामातून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना रोजगार मिळत असला तरी, त्यांना मिळणारा मोबदला (मानधन/कमिशन) हा नेहमीच तुटपुंजा राहिला आहे.
महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांनी त्यांच्या उत्पन्नातील कमतरता १००% वाढवावी अशी मागणी लावून धरली आहे.
केंद्रचालकांच्या म्हणण्यानुसार, शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत नेहमीच भावनात्मक वागणूक दिली आहे. त्यामुळे या असंतुष्टतेपोटी संघटनेने नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केली आहे, तरीही शासन आपली ‘कृती’ करण्यास तयार नाही.

‘राज्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांनी शासनास सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे. पण, जर संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर राज्यातील सर्व महा ई-सेवा व आधार सेवा केंद्र दिनांक १२/११/२०२४ ते १४/११/२०२४ पर्यंत काम बंद आंदोलन करून आपले केंद्र बंद ठेवणार आहेत आणि याची सर्व जबाबदारी शासनावर राहील असे संघटनेने शासनाकडे त्यांच्या मागण्यांचा योग्य विचार करण्याची विनंती केली आहे.

​तीन दिवसांच्या या काम बंद आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सरकारी सेवा (उदा. प्रमाणपत्रे, आधार अपडेट) मिळण्यास मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रचालकांच्या उत्पन्नाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button