महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत.सरपंच सुनिता सुरवसे

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्य वतीने अनेक प्रयत्न सुरू आहेत,महिला सक्षमीकरण हा देशा समोरचा खूप महत्त्वाचा विषय झाला आहे.यासाठी शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्याकडून महिला सबलीकरण,महिला सक्षमीकरण या विषयांवरती अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी यांनी दत्तनगर- खंडाळी या गावात बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या विषयावरती जनजागृती करणारा उपक्रम हाती घेण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी दत्तनगर परिसरातील ४८ महिला उपस्थित होत्या,त्याचबरोबर गावच्या सरपंच सौ.सुनीता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सत्यजित चव्हाण यांनी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी बचत गटांची गरज या विषयावरती महिलांना उत्तम असे मार्गदर्शन केलं
त्याचबरोबर स्थानिक बचत गटाच्या प्रमुख सौ,प्रियांका निंबाळकर,सौ.वर्षा पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.सध्या महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी बचत गटांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे महिलांमध्ये नेतृत्व व कौशल्य वाढीला लागत आहे,त्यांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावरती उभ केल जात आहे.त्याच बरोबर समाजामध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण करण्यासाठी बचत गटांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळेच स्वयंसेवकांनी गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला

याबद्दल गावच्या सरपंच सुनिता सुरवसे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कौतुक केले,त्याचबरोबर स्थानिक बचत गटांच्या सी.आर.तृप्ती जगताप यांनी उपक्रमासाठी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वयंसेवक सत्यजित चव्हाण विक्रम खंडागळे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांना पत्रकार संजय लोहकरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम उत्कृष्टरित्या राबविल्याबद्दल शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे,कार्यक्रम समन्वयक डॉ.चंकेश्वर लोंढे, कार्यक्रम अधिकारी डॉ.सविता सातपुते,प्रा.सज्जन पवार,प्रा.दत्ता मगर यांनी स्वयंसेवकांचे आभार मानले.



