शहर

हलक्यांचा कडकडाट व टाळ, मृदुंग, पखवाज यांच्या गजरात रेल्वे थांबण्यासाठी पारेवाडी येथे भव्य मोर्चा

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे असणारे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा ही मागणी 1997 पासूनची आहे परंतु,या मागणीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील नागरिक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी भव्य दिव्य असा एल्गार मोर्चा काढून पारेवाडी स्थानकावर मागण्या करण्यात आल्या यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक,ग्रामस्थ,महिलामंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केत्तूर ग्रामपंचायत कार्यालयापासून हलगीचा कडकडाटासह व टाळ,मृदंग,पखवाज यांच्या गजरात सर्वच मोर्चात सहभागी झाले होते त्याबरोबर नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, अजित रणदिवे,तानाजी झोळ (सरपंच वाशिंबे),डॉ.अमोल दुरंदे(सरपंच राजुरी),संतोष वारगड(सरपंच रामवाडी, मनोहर हंडाळ (सरपंच कात्रज),अंड.सविता शिंदे,हनुमंत पाटील (सरपंच हिंगणी) आर.आर.साखरे,संदीप काळे (वृक्ष प्राधिकरण पुणे),सुहास गलांडे, डॉ.गोरख गुळवे,श्याम सिंधी,नरेंद्र ठाकूर,शिवाजी चाकणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सदर मोर्चा पारेवाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुख्य स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अँड.अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील,देवराव नवले,सूर्यकांत पाटील,डॉ.अमोल दुरंदे डॉ.जिनेन्द्र दोभाडा,रामदास झोळ,हरिश्चंद्र खाटमोडे,विजय येडे,विलास कोकणे,अजित रणदिवे,संदीप काळे यांची भाषणे झाली.यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.

सदरच्या मोर्चाला जनशक्ती शेतकरी संघटना,प्रहार संघटना, वकील बार असोसिएशन,मेडिकोज गिल्ड असोसिएशन, केत्तूर सर्व व्यापारी बंधू आदी संघटनांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता.

या मोर्चात दत्तात्रय कोकणे,रामराव पाटील,प्रशांत नवले,किरण निंबाळकर,सचिन कनिचे,उदय पाटील,लक्ष्मीकांत पाटील,शहाजी पाटील,राजेंद्र कटारिया,राजेंद्र खाटमोडे,बापूसाहेब पाटील,संतोष पाटील,संजय साळवे,सागर खैरे,राजाराम माने,मालोजीराव पाटील,दिलावर मुलानी,लक्ष्मण महानवर,यांचेसह दिपाली डिरे,कीर्ती पानसरे,सारिका कोकणे,कमल गुंजाळ,अशोक साळवे,तानाजी गुंजाळ, मंगल बाटिया,संगीता कटारिया आदी सहभागी झाले होते. स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अँड.अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील,देवराव नवले,सूर्यकांत पाटील,डॉ.अमोल दुरंदे डॉ.जिनेन्द्र दोभाडा,रामदास झोळ,हरिश्चंद्र खाटमोडे,विजय येडे,विलास कोकणे,अजित रणदिवे,संदीप काळे यांची भाषणे झाली.यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button