महाराष्ट्र

अकलूज: श्री हनुमान जन्मोत्सवाच्या नियोजनासाठी वडार समाज व एस.बी. ग्रुपची बैठक संपन्न

​लक्ष्मण तात्या बनपटे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज एकवटला; ‘तात्यांच्या’ निरोपामुळे समाजबांधव झाले भावूक.

Times 9 Marathi News Network अकलूज प्रतिनिधी सोमनाथ पवार

​अकलूज : येथील जुना बाजार तळ स्थित कै. बाबासाहेब माने पाटील खुले नाट्यगृह व कार्यालय येथे मंगळवार, १७ मार्च रोजी सकल वडार समाज आणि एस.बी. ग्रुपच्या वतीने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. आगामी २ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सवाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेली ही बैठक अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

​या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले ते लक्ष्मण बाबाजी बनपटे (तात्या) यांनी दिलेला मार्गदर्शनपर संदेश. तात्या सध्या कायदेशीर कारणास्तव तुरुंगात असले, तरी त्यांचे पूर्ण लक्ष समाजाच्या हिताकडे आणि उत्सवाच्या नियोजनाकडे आहे. “तात्या तुरुंगात असूनही समाजातील प्रत्येकाच्या सुख-दुःखाची विचारपूस करतात आणि समाजाच्या प्रगतीसाठी नेहमीच आग्रही असतात,” हे जेव्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले, तेव्हा उपस्थित सर्व समाजबांधव भावूक झाले होते.

​ यावेळी तात्यांनी आपल्या संदेशाद्वारे यावर्षीच्या उत्सवासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत: त्या अशा आहेत
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाईल.जुन्या हनुमान मंदिरातील मूर्तीचे दर्शन आणि पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली जाईल. उत्सवाचा आनंद घेताना कुठेही संविधानाचा गैरवापर होणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

​”सर्व समाजबांधवांनी गट-तट विसरून एकत्र यावे आणि सामाजिक कार्य करावे,” असे आवाहन तात्यांनी केले. त्यांच्या या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला असून, श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

​या बैठकीला सकल वडार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, एस.बी. ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. बैठकीचा समारोप अत्यंत सकारात्मक वातावरणात झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button