माळशिरस तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448
माळशिरस तालुक्यातील खंडकरी शेतकरी विविध मागण्यासाठी साखळी उपोषण करत असून त्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला
महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्ता असो किंवा नसो सदैव शेतकऱ्यांच्या बाजुने कायम शेतकऱ्यांना न्याय देण्याचे च काम केलेले आहे.म्हणून बळीराजाला न्याय मिळावा यासाठी माळशिरस तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण केले होते, त्या उपोषणाचे नेतृत्व खंडकरी शेतकऱ्यांनचे नेते शेतकऱ्यांचा बुलंद आवाज सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी केले आहे. त्या उपोषणाला शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. असून यावेळी वे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनमताई अभंगराव, युवा सेना जिल्हा प्रमुख- गणेश इंगळे, शिवसेना महिला आघाडी पंढरपूर तालुका प्रमुख- संगीता पवार , युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख- श्रीनिवास उपळकर. शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख- पूर्वा पांढरे, गणेश पराडे पाटील, यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला, याप्रसंगी इतर संघटनाचे नेतेमंडळी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.



