शहर

वीज वितरण कंपनीकडून यशवंतनगर येथील वीज प्रवाह सतत बंद केल्यामुळे परिसरातील उद्योगधंदे विस्कळीत

प्रतिनिधी… रियाज तांबोळी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील परिसरात गेली सहा दिवसांपासून सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत वीज वितरण कंपनी कडून वीज प्रवाह बंद केला जात आहे.

त्यामुळे परिसरातील उद्योग व धंदे विस्कळीत झाले आहे याबाबत चौकशी साठी अधिकारी व वायरमन यांना विचारणा केली असता मेन लाईन पंचर आहे. घोटाळा सापडत नाही, काम चालू आहे अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जात आहेत गेल्या 3 महिन्यापासून दिवसातून 20 ते 25 वेळा दररोज वीज पुरवठा खंडित केला जात होता. तो आता सकाळी 10 वाजले पासून रात्री चे 9 वाजेपर्यंत खंडित केला जाऊ लागला.

त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या उद्योगावर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे जर खरेच वीज प्रवाहात अडचण असेल तर फक्त यशवंतनगर परिसरातच ही अडचण का ? यशवंतनगर च्या आजूबाजूच्या परिसरात ही अडचण का नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, नागरिकांतून वीज कंपनीच्या कारभाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

यशवंतनगर परिसरास मेन लाईन निर्माण झाली आहे का ? आजूबाजच्या इतर परिसरातील वीज प्रवाह चालू कसा राहतो याबाबत सदर अधिकाऱ्याची चौकशी व्हावी व सत्य काय आहे ते कळावे असे नागरिकांतून बोलले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button