मित्रांनो काळजीपूर्वक वाचा… महाराष्ट्रातील आरक्षण तक्ता

सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121
महाराष्ट्रातील आरक्षण तक्ता
SC – १३% – एकूण जाती ५९
ST – ७% – एकूण जाती ४७
OBC – १९% – एकूण जाती ३४६
SBC – २% – एकूण जाती ७
VJ – ३% – एकूण जाती १४
NT-B – २.५% एकूण जाती २८+७
NT-C – ३.५% एकूण जाती १
NT-D – २% एकूण जाती १
म्हणजे १०० जागांमधुन १३ SC साठी, ST साठी ७, OBC साठी १९, SBC साठी २, VJ साठी ३, NT-B साठी २.५, NT-C साठी ३.५ आणि NT-D साठी २ एकूण ५२ जागा आणि उरलेल्या ४८ जागा ह्या खुल्या प्रवर्गा साठी असतात.अस भासवल जात असल तरी प्रत्यक्षात मात्र या ४८जागावर खुला प्रवर्गाच्या नावाखाली सर्व जातीच्या लोकांची भरती केली जाते.. म्हणजे इतर जातींच्या वाट्याला येणा-या जागा त्यांचे आरक्षण + ४८जागा येवू शकतात…. उदा-scला जागा१३+४८=७१ जनांना म्हणजे कमीत कमी १३ व जास्ती जास्त ७१ जागा/नोकरी मिळण्याची शक्यता..इतरांचही तसच..
आणि या सगळयातून शिल्लक राहिल तर मराठा जातिला जागा मिळतात आता सांगा काय येते मराठ्यांच्या वाट्याला? १०० पैकी १० ते १५ किंवा जास्तित जास्त २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता.. शक्यता म्हटल मिळतीलच याची खात्री नाही..म्हणजे अक्षरश्: जिवघेणी स्पर्धा… इतर जातितील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, फी माफी,शिष्यवत्ती, भत्ते असतात त्यामुले त्यांचे शिक्षण अगदी फुकटात व नोकरीही आरामात मिळते.. पण मराठ्यांच्या बाबतीत अगदी उलट घडते..
शिक्षणाची प्रचंड फी बापाला कर्ज काढून, उसनवारी करुन, शेती विकून भरावी लागते.. बर इतका खटाटोप करूनही, शिकूनही नोकरीची शाश्वती अजिबात नाही.. पून्हा नशिबी बेकारीच.. त्यामूळे शिकून सवरुनही मराठा समाज पूढे न जाता कर्जबाजारी होत आहे.. उद्योग व्यवसाय करावा म्हटल तर सरकारी मदत मिलत नाही कारण आम्ही मराठा.. कर्ज नाही, सवलत नाही.. दूष्काळ बापाला पिकू देईना..आरक्षण पोराला शिकू देईना..अशी गत आपली झाली आहे..गूणवत्ता असूनही मराठा तरूण अक्षरश: भरडला जात आहे.. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला जात आहे.. सैरभैर झाला आहे..
देशाच्या रक्षणासाठी शेकडो वर्षे लढणारा, सगळ्यांचा पोशिंदा माझा मराठा, या आरक्षण संस्कृतिने अडचणीत आला आहे.. मराठा पोर midc त आणि इतर पोर सरकारी Ac त .. असा विरोधाभास दिसत आहे.. यातून मार्ग एकच..संघटित लढा.. जे आपल्या पिढीन भोगले ते पुढच्या पिढीच्या वाट्याला नको.. संघटित राहिलो तर मराठा आरक्षण दूर नाही.. आरक्षण मिळाले तर कोणत्याही बापाला शिक्षणासाठी कर्ज काढावे लागणार नाही.. नोकरीत हक्काच्या जागा मिळतील..
उद्योगासाठी व्यवसायासाठी कर्जात सवलती मिळतील.. कोणासमोर हातपाय पसरावे लागणार नाहित.. म्हणूनच मित्रानो एकत्रित या.. संघर्ष करूया.. कोणतिही गोष्ट सहजासहजी मिळत नाही.. आम्हाला आयत खायची सवय सुद्धा नाही.. आम्ही मागतोय आमच्या हक्काच.. नाही कुणाच्या घरच…
संघर्ष करुया..आरक्षण मिळवूया…
मराठ्यांनो हात द्या.. विश्वासाची साथ द्या……!!



