भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समिती आणि त्या समितीतील सदस्य

विश्वनाथ आवड सर
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ रोजी झाली.या समितीची मुख्य जबाबदारी भारतासाठी नवीन “संविधान” तयार करणे ही होती.डॉ.बी.आर.आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते.
मसुदा समितीची रचना या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.त्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
अध्यक्ष: डॉ. बी. आर. आंबेडकर
सदस्य:
एन. गोपालास्वामी अय्यंगार
अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
के. एम. मुन्शी
सैयद मुहम्मद सादुल्ला
बी. एल. मित्तर (त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती झाली)
डी. पी. खैतान (१९४८ मध्ये त्यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती झाली)
मसुदा समितीने जवळजवळ १४१ दिवस काम केले.त्यांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी एक सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे संविधान तयार केले. या समितीने तयार केलेला मसुदा २१ फेब्रुवारी १९४८ रोजी संविधान सभेला सादर करण्यात आला.
मसुदा समितीने भारतासाठी संसदीय लोकशाही,मूलभूत अधिकार,राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे आणि एक संघराज्य पद्धती यासारखी महत्त्वाची तत्त्वे समाविष्ट केली.म्हणूनच,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक मानले जाते.



